मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकूण ४८ जागांपैकी तब्बल ३० जागांवर मोठा विजय मिळवला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या. त्यामुळे आगामी महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे जागावाटपाची चर्चा आतापासूनच राज्यात सुरू झाली आहे. यामध्ये कॉंग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणार असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा..भाजपच्या सुर्यकांता पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांकडे १६ आमदार शिल्लक राहिले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेत १४ आमदार शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या कॉंग्रेसचे सर्वाधिक ४४ आमदार सध्या स्थितीत राज्यात आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात कॉंग्रेसचं मोठा भाऊ असणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
यातच राज्यातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी कॉंग्रेस पक्षाला १०० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला ९० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८० जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यातच १८ जागा या महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सोडल्या जातील. अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे.
हेही वाचा..“त्यामुळेच संसदेत आज इंग्रजीत शपथ घेतली”, निलेश लंकेंनी दिली प्रतिक्रिया
महाविकास आघाडीत समसमान जागा वाटप केल्या जातील, अशीही एका बाजूला चर्चा आहे. तसेच दुसऱ्या बाजूला मागच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या सर्व जागा त्या त्या पक्षाला सोडल्या जातील आणि उर्वरित जागा या आपासात वाटून घेतल्या जातील. असेही काही नेते म्हणताहेत.
दरम्यान, यातच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याविना महाविकास आघाडी निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत. यातच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांचे सर्वात जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला देखील ठरला असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन”, उद्धव ठाकरेंनी डिवचलं
हेही वाचा…विधानसभेत पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलणार, शहरात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी
हेही वाचा…विधानसभेआधीच महायुतीत कुरबुरी अन् कटकटीची ठिणगी, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग