मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रात ही यात्रा 15 राहणार असून यामध्ये 300 पेक्षा अधिक किली राहुल गांधी चालणार आहे. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात देखील लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहे. यावरूनच आता भाजपने काॅंग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्तारांवर निशाणा, कार्यकर्त्यांचे मानले आभार..! कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
देश तोडणारे, देश कसे जोडतील असा सवाल करीत भाजपने इतिहासातील जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. काॅंग्रेस आरएसएसवर आणि भाजपवर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत आली आहे. तर आता काॅंग्रेसने सांगावं की, 1946 मध्ये थेट कारवाईची घोषणा कोणी दिली होती.? आणि कोणाच्या पत्रकार परिषदेनंतर कोलकत्त्यासह देशभरात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या आणि हजारो लोक मरण पावले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. असा सवाल भाजपने केला आहे.
“अब्दुल सत्तार दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर..”; पेडणेकरांचा हल्लाबोल
तसेच कोणाच्या दवेषामुळे 1947 मध्ये पुन्हा भीषण दंगल झाली, लाखो लोक मारले गेले आणि देशाची फाळणी झाली? यावेळी भाजप पक्ष नव्हता. पण काॅंग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन पक्षच होते. असंही भाजने म्हटलं आहे. तसेच पुढे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत भाषण करताना म्हणतात, संविधान वाचवण्याची गरज आहे. राहुल गांधीला आणीबाणी बद्दल माहिती नाही का? देशात आणीबाणी लागून करण्यापासून कलम 356 चा गैरवापर करण्यापर्यंत निवडून आलेली सरकारे बरखास्त करण्याचा विक्रम काॅंग्रेसच्या नावावर आहे. मग राहुल गांधी कोणत्या तोंडाने संविधान वाचवायच्या गोष्टी करत आहेत. असा टोला देखील भाजपने लगावला आहे.
Read also
- दिपाली सय्यद शिंदे गटात..! मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार
- सोलापुरात तब्बल 500 हुन अधिक भाजप कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन..! भाजप आमदारांना कंटाळून सेनेत प्रवेश
- राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ…! 11 नोव्हेंबरला ‘भारत जोडो’ यात्रेत होणार सहभागी
- “मग त्या संजय राऊतांवर का गुन्हे दाखल झाले नाहीत..!” चित्रा वाघ य़ांचा सवाल
- “राज्यात इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाचं काय?” करूणा मुंडेंचा सवाल