मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मोठी निवडणुक होणार आहे. यासाठी येत्या १२ जूलै रोजी मतदान पार पडणार असून त्यासाठी आतापासून तयारी सुरू झाली आहे. येत्या २७ जूलै २०२४ रोजी राज्यातील विधान परिषदेतील ११ आमदारांची मुदत संपणार आहे. त्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
हेही वाचा..“आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो, आता आरक्षण सोडतोय”, या गटाने आरक्षणाचा लाभ सोडला ?
विधान परिषदेतील भाजपचे चार, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, कॉंग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक अशा एकूण ११ आमदारांची मुदत संपणार आहे. यामध्ये भाजपचे विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील यांचा समावेश आहे.
यातच मागील काही दिवसापासून भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अन् त्यानंतर महिलांच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे चित्रा वाघ यांना भाजपकडून बक्षिस मिळणार अशी चर्चा आहे. यातच त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच हिरवा कंदील देण्यात आल्याचीही प्राथमिक माहिती समोर आलीय.
हेही वाचा..विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर, ‘या’ पक्षातील आमदारांची मुदत संपली
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील देखील चित्रा वाघ यांच्या नावाला पंसती देण्यात आली असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागामध्ये चित्रा वाघ यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक व्यक्त करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..तिघांचं भांडणं अन् चौथ्याचा लाभ ? जुन्नर विधानसभेची निवडणुक यंदा लक्ष्यवेधी ठरणार ?
हेही वाचा..लोकसभेत पराभव तरी सुप्रिया सुळे अन् नंतर सुनेत्रा पवारांनी घेतली एकाच वेळी खासदारकीची शपथ
हेही वाचा..संसदेत खासदारकीची घेतली शपथ, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी लिहिलं ‘ते’ पत्र