मुंबई : मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली आहे. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं आहे.
यामुळे पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलवर कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यानुसार रिपब्लिक चॅनेलचं सी एफ वो शिवा सुब्रम्हणयम यांना आज क्राईम ब्रांच च्या अधिकाऱ्यांनी चौकशी साठी बोलावलं होतं.मात्र,त्या आधीच रिपब्लिक चॅनेलने सकाळीच सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाई विरोधात अर्णव गोस्वामीच्या रिपब्लिक चॅनेलनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी होईपर्यंत कारवाई न करण्याची विनंती रिपब्लिकच्या वतीनं करण्यात आली आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाई विरोधात अर्णव गोस्वामींच्या रिपब्लिक चॅनेलनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पुढील आठवड्यात रिपब्लिकच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये,असं रिपब्लिक चॅनेल तर्फे मुंबई पोलिसांना कळवण्यात आलं आहे. यामुळे रिपब्लिक चॅनेलचे सीएफओ शिवा सुब्रम्हणयम चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
रिपब्लिक चॅनेलने घटनेच्या कलम 32 नुसार याचिका केली आहे. त्याचा क्रमांक 7848/2020 असा आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. यामुळे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने आपण तपासाची घाई करू नये, अस शिवा सुब्रम्हणयम यांनी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस 5 जणांची चौकशी करणार होते. शिवा सुब्रम्हणयम,आईएफवो,रिपब्लिक चॅनेल, सॅम बलसारा , चेअरमन , मॅडसन जाहिरात कंपनी, शशी सिन्हा , लिंटास जाहिरात कंपनी, फक्त मराठी चॅनेलचे सी इ ओ आणि बॉक्स चॅनेलचे सीइओ यांची चौकशी होणार होती.
मात्र,आजच्या चौकशीला केवळ मॅडसन कंपन चे मालक सॅम बालसारा आणि लिंटासचे शशी सिन्हा हे दोघेच हजर होते. बाकी सर्वांनी आपण बाहेर आहोत,असं सांगून चौकशीला दांडी मारली. सुमारे सात तासाच्या चौकशी नंतर त्या दोघांना सोडून देण्यात आलं.
Read Also :
भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत : मोहन भागवतhttps://t.co/c1Z8G8uukd#MohanBhagawat #RSS
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020