बीड : ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या आठ दिवसापासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीत प्रा. लक्ष्मण हाके उपोषण करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो ओबीसी बांधव वडीगोद्री गावात दाखल झाले आहेत. अशातच काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेत. त्यानंतर हाकेंच्या शिष्टमंडळांने मुंबईत यावे अन् चर्चा करावी असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी वेळ दिला आहे. कुठेही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, दोन समाजात कोणतीही दरी निर्माण करायची नाहीय. असा आमचा प्रयत्न असणार आहे. यातील कोणत्याही समाजाचं अहित होऊ नये, अशी सरकारची मानसिकता राहिलीय. आम्हाला सगळ्यांचे प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडावयाचे आहेत. अशी प्रतिक्रिया देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी दाखल झाले असता. कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा, अशी मागणी हाकेंनी केलीय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून देखील संवाद साधलाय. यातच मागण्या मान्य न झाल्यास मरेपर्यंत उपोषण करण्याची तयारी नवनाथ वाघमारे यांनी दर्शवली आहे. त्यानंतर हाकेंच्या शिष्टमंडळाने चर्चेसाठी मुंबईत बोलवण्यात आले आहे.
या संपुर्ण प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांनी देखील राज्य सरकारकडे मोठी मागणी केलीय. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हाकेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुंबईत आज सायंकाळी मोठी खलबतं
हेही वाचा…बच्चू कडूंच्या जीवाला अज्ञातांकडून धोका, पोलिसांना लिहिलं ‘हे’ पत्र
हेही वाचा…लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल, सरकारने घेतला हा निर्णय
हेही वाचा..“ज्याचा मी प्रचार केला असता तो ४८ मतांनी नाही तर..”, गजानन किर्तीकर यांचं मोठं विधान