जालना : राज्यात आता गेल्या आठ दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावसाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाच्या स्थळी संपुर्ण राज्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. तर आज सरकारचं शिष्टमंडळ देखील उपोषणाच्या स्थळी भेट दिली. यावेळी कुणबी नोंदी दिलेल्या त्या रद्द करा, अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे. त्यावर आता मराठा आरक्षण उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला कडक इशारा दिलाय.
मी माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. अन्याय होऊ देणार नाही, हे आमच्या ध्यानात आले. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाला पडून आमच्यावर अन्याय करणार असे दिसते आहे. तुम्ही सरकार म्हणून फुस लावता. त्यांना आंदोलनासाठी तुम्हीच उभे करता. मी तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…हाकेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुंबईत आज सायंकाळी मोठी खलबतं
तो येवल्याचा चाब्रा आहे. त्याला आता राजकीय आयुष्यातून उठवेल. गाड्या पुरवितो. आमच्या आमच्यात लावून देतो. लढणाऱ्या लोकांनाही कळत नाही. त्यांना राज्यातील पडलेली गॅंग साथ देत आहे. आता बघुया बघू उत्तर देऊ. आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन केलं. त्याच ठिकाणी आंदोलन उभं केलंंय. तुम्ही आम्हाला खिंडीत पकडता. डाव साधता. मी ९ मंत्री पाडणार. १३ तारखेनंतर सांगतो. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय
हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ?