मुंबई : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सगळीकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राजकारण तापलं…! सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचं शिष्ठामंडळ राज्यपालांच्या भेटीला
सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवून स्वत: चे वलय निर्माण केले आहे. त्यांनी मतदारांशी प्रामाणिकपणा ठेवलेला आहे. सुप्रिया सुळे या आदर्श घेण्यासारख्या आहेत. त्यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. सत्तार बेगडी हिंदुत्व घेऊन महाराष्ट्रात नाचत आहेत. ते मंत्री आहेत. मात्र ज्या शब्दाचा उच्चार केला जाऊ शकत नाही. असा शब्द त्यांनी वापरला आहे. दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर, हे योग्य नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
भारत जोडो यात्रेत नागपुर येथील काॅंग्रेस नेत्याचं निधन..! महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला अन्…
अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कुणीही महिलाबाबत अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या बाजूच्यांना जसे लागू आहे, तसे त्यांना देखील लागू आहे. आचारसहिंता दोन्ही बाजूने पाळली पाहिजे. सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खुप खाली चालली आहे. सगळ्याबाजूंच्या लोकांनी आचारसहिंता पाळली पाहिजे. मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे. असंही फडणवीस म्हणाले.
“फडणवीस त्या हिरव्या सापाला फेकून द्या, नुकसान तुमचचं होईल”; चंद्रकांत खैरे
दरम्यान, यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील विरोधकांना सुनावलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधात संताप कितपत योग्य? कंगना रनौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थनच नाहीच. गेल्या अडीच वर्षात काही का केले नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल झाले नाहीत. एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणे हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का ? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. असे खोचक सवाल चित्रा वाघ य़ांनी केले आहेत.
Read also
- ‘हर हर महादेव’ चित्रपटात राज ठाकरेंनी पैसे गुंतवले का ? राष्ट्रवादीचा सवाल
- कुणी पोलिसांना, कुणी राजकीय नेत्यांना, तर कुणी काय..? शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची संपुर्ण यादी
- सत्तारांनंतर आता रामदास कदमांची जीभ घसरली..! अर्वाच्च भाषेत सेनेच्या नेत्यांवर टिका
- “हा विषय माफी मागून संपणार नाही, अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा”
- नोटाबंदीला 8 वर्ष पुर्ण..! राष्ट्रवादीकडून ”नोटाबंदीचा श्रद्धांजली” वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन