नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालात भाजपसह एनडीएने एकूण २९२ जागा जिंकत आघाडी घेतली असली तरी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत कडवे आव्हान दिले आहे. दोन्ही गटातील घटकपक्षांची आकडेवारी लक्षात घेता, पक्षीय बलाबलाचा विचार करत एकट्या भाजपने जिंकलेल्या २४० जागा या एकूण इंडिया आघाडीच्या २३४ जागांच्या तुलनेत अधिक आहेत. मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. यातच आता पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी यांचं नाव समोर येऊ लागलं आहे.
हेही वाचा..अजित पवार गटातील आमदार बंडाच्या तयारीत, तातडीची बोलावली आमदारांची बैठक
काल एनडीएच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेते पदी निवड केली आहे. यावर २१ नेत्यांच्या सह्या होत्या. यातच जर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्यापेक्षा चांगला पर्याय समोर असू शकत नाही. अशी प्रतिक्रिया बिहारमधील पुर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेले पप्पु यादव यांनी दिलीय.
हेही वाचा..अजित पवार गटाचे नाराज आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर, राज्यात पुन्हा राजकीय भुकंप
दरम्यान,लोकसभेच्या आधीच नितीन गडकरी यांचं पंतप्रधानपदासाठी नाव चर्चेत आलं होतं. देशात भाजपचं सरकार अल्पमतात आलं तर गडकरीशिवाय भाजपकडे पर्याय नसल्याचे मत व्यक्त करण्यात आलं होतं. यातच आता येत्या ०९ जुन रोजी पंतप्रधान पदाचा शपथ विधी पार पडणार आहे. त्यावेळी एनडीएकडून कुणाला संधी दिली जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ?
हेही वाचा..मोठी बातमी…! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार लंकेंच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला
हेही वाचा..“मी पुन्हा येईन असा गळा फोडून सांगणारे आता मला जाऊदे ना घरी म्हणताहेत”