जालना : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यानंतर ओबीसी समाजाच्या दोन ते तीन मागण्या सोडल्या तर सर्व मागण्या पुर्ण झाल्या आहेत. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्यानंतर१० दिवसापासून सुरू असलेलं उपोषण मागे स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी आज केली आहे. तसचे आम्ही फक्त उपोषण स्थगित केलं आहे. परंतु हा लढा तसाच सुरू राहिल असा इशाराही यावेळी हाके यांनी दिलाय.
हेही वाचा..“आरक्षण देतांना कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये, ही ठाकरे गटाची भूमिका”
काल मुंबईत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्यासमवेत सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये या शिष्टमंडळाचं नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं होतं. यातच आज छगन भुजबळ यांच्या हस्ते लक्ष्मण हाके यांनी पाणी पिऊन उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत धनंजय मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर इत्यादी नेते होते.
हेही वाचा..दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले ? उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार
दरम्यान, गेल्या दहा दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू होतं. यातच हाकेंना पाठिंबा देण्यासाठी संपुर्ण राज्यातून ओबीसी बांधव वडीगोद्री गावात दाखल झालेत. यातच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ आले असता ओबीसी बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी बांधवांनी एकच जल्लोष साजरा केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“बर्फातला प्राणी बर्फातच पाठवुया”, वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी
हेही वाचा..“छगन भुजबळांचं राजकीय आयुष्य असं कोणालाही संपवता येणार नाही”
हेही वाचा..भाजपची रात्री ०८ ते ०१ पर्यंत मॅरेथॉन बैठक, भाजपने घेतला मोठा निर्णय ?