अमरावती : अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेल्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना यावेळेस पराभवाचा सामाना करावा लागला. याठिकाणी भाजप कॉंग्रेस आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. त्यानंतर कॉंग्रेसच्या उमेदवाराने याठिकाणी बाजी मारली. आता यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच नवनीत राणा यांना पाडण्यासाठी मातोश्रीवरून बच्चू कडू यांना रसद पुरवली गेली. असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलाय.
अमरावती लोकसभा मतदारसंघात कमळाच्या चिन्हावर लढलेल्या नवनीत राणा यांचा दारूण पराभव झाला. या पराभवाचे खापर आता बच्चू कडू यांच्यावर फोडले जात आहेत. अशातच बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवलीबाज नेते आहेत. ते खोक्यांचं राजकारण करत आले आहेत. ते कुणाचीही सुपारी घेऊ शकतात. त्यांना मातोश्रीवरून रसद आली. अनेक ठिकाणाहून रसद आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. माझ्याकडे निरोप देण्यात आला. चर्चा झाली. ते सर्व मी अचलपुरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार असंही रवी राणा यांनी सांगितलंय.
पुढे बोलतांना रवी राणा म्हणाले की, दोन महिन्यात सर्वांचा जनता हिशोब घेणार आहे. आता राणांचा नंबर आहे, असा दम बच्चू कडू यांनी दिला आहे, मला इथपर्यंत जनतेने पोहोचवलं आहे. जनता मला जेव्हा थांबा म्हणेल. तेव्हाच मी थांबेल. मला थांबवण्याचा कोणत्याही नेत्यात दम नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं, शरद पवारांचं वेगळं”