मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत,शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील उत्तर प्रदेश सरकारला खडे बोल सुनावत या घटनेबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फिल्मसिटी काढायला निघालेले आहे, त्या राज्यात जिथे महिला सुरक्षित नाही. अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणी संबंधित मुलींना संरक्षण देणे गरजेचे आहे असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी उत्तरप्रदेश सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे अतिशय गरजेचे आहे तसेच उत्तर प्रदेश सरकारने बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन केलेले आहे म्हणून या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय यांच्याकडे निवेदनाचे पत्र दिले असल्याचे देखील व्हिडिओच्या मार्फत नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
त्यासोबत गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे. हाथरसच्या घटनेमधून परत महिलेल्या सुरक्षासंदर्भात उतर प्रदेशात भीषण अवस्था समोर आलेली आहे. उत्तर प्रदेश सरकार मध्ये जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.
#शिवसेना #ऊत्तर प्रदेशातील हाथरस धक्कादायक घटनेविषयी..ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेश मध्ये फिल्मसिटी काढायला निघालेले आहे ज्या राज्यात जिथे महिला सुरक्षित नाही: माननीय राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय उत्तर प्रदेश सरकारच्या बेजबाबदारपणाबाबत पत्र pic.twitter.com/foJ9VxOE98— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) September 30, 2020
A day of shame for India and us Indians and as a Nation.Parents were not allowed to perform last rites of their daughter. What hope does any girl or parents have to save their daughter from brutal Rapes.please wake up and rise to this extreme injustice.@rashtrapatibhvn
— Dr. Ranjana Kumari (@ranjanakumari) September 30, 2020