मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आता कोण मोठा आणि कोण लहान यावरून वाद सुरू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक देखील बघायला मिळत आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून सगळ्यांना खडेबोल सुनावलेय.
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”
आज तीन पक्षांची विधानसभेच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने प्राथमिक बैठक झाली. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो. त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू. आता मोठा भाऊ आणि छोटा भाऊ चालणार नाही. प्रत्येक जागेवर चांगला उमेदवार कोण आहे? हे बघून निर्णय घेऊ, लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय होईल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलीय. लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघआडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये ३० ते ४० च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केले. पक्ष आणि संघटनांची ही यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रात चांगलं वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“देशातील जनता जागी झाली, मोदींचं पद कसंबसं वाचलं”, उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक टोला
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं