मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा बंड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यातच अजित पवार गटातील पंधरा ते सोहा आमदार पुन्हा शरद पवार गटात येणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यात बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळंके यांचा देखील नाव समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : आधी लोकसभेचं सभापतीपद मिळवा, नाही तर…
प्रकाश सोळंके म्हणाले की, जो दावा करण्यात आलाय, तो एक प्रचाराचा भाग आहे. परवा आमची बैठक झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील कोणताही आमदार सोडून तिकडे जायला तयार नाही. असं म्हणत रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा भेटीगाठी घेतल्या आहेत. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लोकसभेत पवार साहेबांचा विजय झाला आहे. त्याला इतर कारण आहे. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय हा राष्ट्रवादीच्या पक्षामुळे झाला आहे. तो असं मी समजत नाही. मराठा आरक्षण, मुस्लिमांची मत, आणि दलितांची नाराजी हे त्याला कारणीभूत होतं. परंतु तशी परिस्थिती विधानसभेला राहणार नाही. जो घटक नाराज आहे. त्याला आम्ही निश्चितपणे सोबत घेण्याचा प्रयत्न करू असे देखील प्रकाश सोळंके म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष “‘ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
हेही वाचा…मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला किती खाती मिळणार ? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच बोलले
हेही वाचा…लोकसभेत श्रीकांत शिंदेंची शिवसेना गटाच्या नेतेपदी निवड, तर बारणे व्हीप प्रमुख
हेही वाचा..विदर्भातील ‘ते’ दोन बडे नेते कोण ? लवकरच ठाकरे गटात इन्कमिंग सुरू होणार ?