सतीश चव्हाण यांना तब्बल 1,16,638 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58,743 इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे 57,895 मताधिक्क्यानं सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला निकाल आला. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उर्वरित पाचपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.मागील निवडणुकीतसुद्धा भाजपतर्फे शिरीष बोराळकर हे उमेदवार होते.