पुणे : निवडणुकीमध्ये दहशत कधी असता कामा नये, कारण ही लोकशाहीची लढाई आहे. लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाच्या मतदानाचा अधिकार हा निर्णायक आहे. लोकशाहीमध्ये नेता कितीही मोठा असला तरी सर्वसामान्य मतदार हा त्यापेक्षा मोठा असतो. असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बारामतीच्या मोरगाव गावातील शेतकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, यावेळची निवडणूक ही सामान्य लोकांनी, तरुण पिढ्यांनी, कष्टकऱ्यांनी हातात घेतली होती. मी स्वतः आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बसलो आणि आम्ही ठरवलं की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढायची. मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये १८ दौरे केले, १८ ठिकाणी सभा केल्या. मला सांगायला वाईट वाटतं की ज्या अठरा ठिकाणी ते गेले त्यातील दहा ठिकाणी त्यांचा उमेदवार पडला. असा टोलाही त्यांनी लगावला.
तर परवा मी सांगितलं दिल्लीला जाईन. त्या वेळेला भेटून सांगेन मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेलात. त्याचे ५० टक्के लोक पराभूत होतात. उद्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. तुम्ही जास्त तिथे या म्हणजे काय होतं ते आम्हाला बघायला मिळेल. असा इशाराही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.
READ ALSO :
हेही वाचा..“मी ९ मंत्री पाडणार, १३ तारखेला सांगतो,” मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
हेही वाचा…अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय
हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ?