मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर जनतेचं आभार मानण्यासाठी आज महाविकास आघाडीची मुंबईत सयुंक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर मोदींच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या. तेथील महायुतीचे उमेदवार पडलेत. असा टोलाही शरद पवारांनी लगावला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही. त्यांना एवढचं सांगायचं आहे. जे जुन्या काळातील काही स्टेटमेंट त्यांनी केलं. ते काढून ाता बदनामी केली जाते आहे. तो सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांच्या बाबतीत यापुर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना जेलमध्ये गेलीत. आजही तुरूंगात आहेत. याचा अर्थ हा सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे.सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी ही भूमिका घेतली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं, पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील. अजितदादांना घेऊन ब्रॅंड व्हॅल्यू ? की काय तो त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आम्हा का सांगावं ? असा सवालही त्यांनी केला. तर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. देशाच्या पंतप्रधानांनी अशा काही सभा घेतल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या सभा होती. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा..“देशातील जनता जागी झाली, मोदींचं पद कसंबसं वाचलं”, उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक टोला
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”