सोलापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचं इकडून तिकडे पक्षांतर करीत आहेत. यातच दक्षिण सोलापुरातील भाजपचे जवळपास 500 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटात राज ठाकरेंनी पैसे गुंतवले का ? राष्ट्रवादीचा सवाल
सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे भाजपचेच आमदार सचिन कल्याणशेट्टी या दोन्ही नेत्यांना कंटाळून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. यांच्यासोबत सोलापुरमधील स्थानिक नेत्यांच्या छळामुळे तसेच या भागाला कोणताच निधी लोकप्रतिनिधी देत नाहीत. त्यामुळे आम्ही आता शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
कुणी पोलिसांना, कुणी राजकीय नेत्यांना, तर कुणी काय..? शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची संपुर्ण यादी
लहानपणापासून आता पर्यंत 16 ते 17 वर्ष भाजपचं काम करीत आलो आहे. परंतु आतापर्यंत भाजपचे कोणतेही स्थानिक नेते आम्हाला विश्वासात घेत नाहीत. तसेच त्यांच्याकडून आम्हाला कोणताही विकास निधी आला नाही. त्यामुळे या अन्याया विरोधात उठाव करण्यासाठी आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. तसेच फार मोठी शक्ती उद्धव ठाकरे यांच्या पाठिमागे लावू असं आश्वासन देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिलं.
सत्तारांनंतर आता रामदास कदमांची जीभ घसरली..! अर्वाच्च भाषेत सेनेच्या नेत्यांवर टिका
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांची जोरदार इनकमिंग, आऊटगोईंग होण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या गटातील जवळपास 40 आमदारांना निवडून न येण्याचा धोका जाणवू लागला आहे. शिवसेनेविरोधातील बंडामुळे मतदार संघातील नागरिक नाराज असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यातील 222 ते 25 आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also
- राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ…! 11 नोव्हेंबरला ‘भारत जोडो’ यात्रेत होणार सहभागी
- “मग त्या संजय राऊतांवर का गुन्हे दाखल झाले नाहीत..!” चित्रा वाघ य़ांचा सवाल
- “राज्यात इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाचं काय?” करूणा मुंडेंचा सवाल
- सत्तारांवर निशाणा, कार्यकर्त्यांचे मानले आभार..! कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “अब्दुल सत्तार दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर..”; पेडणेकरांचा हल्लाबोल