जालना : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई तुमच्यावर मराठ्यांनी विश्वास टाकला आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. जर असं घडलं तर मराठ्यांचा पुढचा लढा मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल. असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. असं आश्वासन सरकारने ओबीसी दिल्यानंतरच उपोषण स्थगित करत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारलाच इशारा दिलाय.
हेही वाचा…“बर्फातला प्राणी बर्फातच पाठवुया”, वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी
मराठ्यांनीही तुम्हाला मत दिली आहेत. फडणवीससाहेब हे षडयंत्र हाणून पाडा. नाहीतर माझा नाईलाज आहे. आमच्या मुंडक्यावर पाय देऊन आमच्या हक्काचं असून आम्हाला खायला देणार नसतील तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशनविरोधात असेल. सगळे ओबीसी एक झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार. कारण त्या नोंदी आणि गॅझेट आमच्या हक्काचं आहे. तिन्ही गॅझेट १३ तारखेच्या आत पाहिजे. फडणवीस तुम्हाला मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसेल तर छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांना आमच्या अंगावर सोडलं असंल तरीही तुम्ही सावध व्हा. असेही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“छगन भुजबळांचं राजकीय आयुष्य असं कोणालाही संपवता येणार नाही”
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, आम्हाला धक्का लागतोय. त्यांना काय धक्का लागतोय. आमचं आरक्षण आम्ही घेणार. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे. तेच आंदोलन करायला लावतात. सत्ताधारी म्हणून हे सर्व मॅनेज झाले आहेत. आमच्या आरक्षणाता ते आहेत. त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहिती नाही. आमच्या ओबीसी नोंदी आहेत. हक्काच्या नोंदी आहेत. अर्ध्या तासापुर्वी पुरावे मिळाले आहेत. असेही जरांगे पाटील म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“महायुतीतील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर”, शरद पवार गटाने डिवचलं
हेही वाचा..लक्ष्म्ण हाकेंच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून मागण्या मान्य, उपोषण स्थगित