पुणे : कल्याणीनगर भागात पोर्श कारनं दोघांना चिरडलं अन् त्यात दोन तरूणांचा बळी गेला. अपघात झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठल्याने त्यांनी पोलिसांवर दबाव आणणल्याचा आरोप करण्यात आला. यावरून विरोधकांनी सुनील टिंगरे यांच्यावर टिकेची जोरदार झडप घातली. असं होत असतांना महायुतीच्या मित्र पक्षातील कोणत्याही नेत्यांनी यावर चकार शब्द न काढल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सुनील टिंगेर अडचणीत आले तर या मतदारसंघावर विधानसभेत भाजप दावा सांगणार का ? अशीही चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा..छगन भुजबळांचा यू-टर्न, म्हणाले, “एवढा काही मी मुर्ख नाही की…,”
पोर्शे कार अपघात प्रकरणात सुनील टिंगरे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मात्र तरी देखील याच मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या जगदीश मुळीक यांनी मित्र पक्षाचा आमदार अडचणीत येऊनही मदतीसाठी धाव घेणे दुरच. एक चकार शब्दही काढलेला नाहीय. कार्यकर्त्यांनाही त्यांनी या प्रकरणापासून कटाक्षाने दुर ठेवल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…“जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू, तेव्हा तपशीलवार चौकशा करू,”आदित्य ठाकरेंनी दिला इशारा
बदलत्या राजकारणात विधानसभेच्या जागा वाटपामध्ये वडगाव शेरी मतदारसंघाची मागणी करणार का ? या प्रश्नावर देखील त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय. त्यामुळे सुनील टिंगेर या प्रकरणात अडकले तर याठिकाणी महायुतीत कोणाला उमेदवारी दिली जाणार ? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरश: झापले ! प्रकरण काय ?
हेही वाचा..“खर्गेंनी मोदींना डिवचलं,” तोच व्हिडीओ बावनकुळेंनी दाखवत राऊतांवर साधला निशाणा
हेही वाचा..“हाच आहे का महायुती सरकारचा गतिमान कारभार ?” पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत ?