मुंबई : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सगळीकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. काल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यावर आता खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नोटाबंदीला 8 वर्ष पुर्ण..! राष्ट्रवादीकडून ”नोटाबंदीचा श्रद्धांजली” वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती , माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे.
भारत जोडो यात्रेत नागपुर येथील काॅंग्रेस नेत्याचं निधन..! महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला अन्…
पुढे त्या म्हणाल्या की, मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी , जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. असंही त्या म्हणाल्या.
“फडणवीस त्या हिरव्या सापाला फेकून द्या, नुकसान तुमचचं होईल”; चंद्रकांत खैरे
दरम्यान, सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात सगळीकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र काल सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाबाबत बोलण्याचं टाळलं होतं.
Read also
- “अब्दुल सत्तार दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर..”; पेडणेकरांचा हल्लाबोल
- ‘हर हर महादेव’ चित्रपटात राज ठाकरेंनी पैसे गुंतवले का ? राष्ट्रवादीचा सवाल
- कुणी पोलिसांना, कुणी राजकीय नेत्यांना, तर कुणी काय..? शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची संपुर्ण यादी
- सत्तारांनंतर आता रामदास कदमांची जीभ घसरली..! अर्वाच्च भाषेत सेनेच्या नेत्यांवर टिका
- “हा विषय माफी मागून संपणार नाही, अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा”