करमाळा: महाराष्ट्रात आता उन्हाळा संपत आला आहे. पाण्याच्या प्रश्नावरून आता अख्खा महाराष्ट्र पेटलेला सध्या दिसत आहे. कुकडी पाण्याचे आवर्तन, उजनी चे पाणी हे विषय सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत. पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात सोलापुरातील आमदारांनी पाणी प्रश्नी मोट बांधली आहे. उजनी च्या पाणी प्रश्नावरून इंदापूर विरुद्ध सोलापूर असा संघर्ष बघायला मिळत आहे. उजनी जलाशयातून पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याच्या शासन निर्णयाची येत्या २२ मे रोजी सकाळी करमाळा तालुक्यातील गावा – गावात होळी करण्याचा निर्णय उजनीधरणग्रस्त संघर्ष समितीच्या बैठकीत जेऊर येथे घेण्यात आला आहे.
उजनी जलाशयातील पाणी इंदापूर तालुक्यातील देण्यास मोठा विरोध आहे. या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी आता सोलापूर वासियांतर्फे त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. Ujani Pani Sngharsh Samiti संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि नेते प्राध्यापक शिवाजी बंडगर Ujani Pani Sngharsh Samiti – President Professor Shivaji Bandagar आणि अजित विने यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जेऊर येथे पार पडलेल्या उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत यावेळी शिवाजी बंडगर बोलत होते. सध्या कोरोनाच्या असलेल्या महामारीमुळे रस्त्यावरची लढाई तूर्तास तरी नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. The decision of the sangharsh samiti to protest against the government decision to supply water to Indapur from the Ujani dam
शासनाने दिलेल्या निर्णयाबद्दल फेरविचार करावा यासाठी सर्वप्रथम शासनाला निवेदन देणे, त्यानंतर चर्चा करणे आणि स्प्ष्ट विरोध दर्शविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. २२ मे रोजी सकाळी ९ वाजता कोरोनाचे नियम पाळून इंदापूरला पाणी देण्याच्या प्रस्तावित योजनेला मंजुरी देणाऱ्या आदेशाची होळी करण्याचे ठरवले आहे. यावेळी चर्चेत पं. स. सभापती गहिनीनाथ ननवरे, महेंद्र पाटील, गोरख गुळवे, ॲड. दीपक देशमुख, तात्या सरडे, विजय नवले, धुळा कोकरे, सागर खांडेकर, गंगाधर वाघमोडे, राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते.