नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालात भाजपसह एनडीएने एकूण २९२ जागा जिंकत आघाडी घेतली असली तरी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत कडवे आवाहन दिलेय. यामध्ये भाजपने एकूण २४० जिंकल्या. परंतु ते बहुमतापासून थोडे दुर राहिलेत. यातच त्यांना आता सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना आता मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा शपथ विधी येत्या ०९ जूनला होण्याची शक्यता आहे. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा फॉम्युला ठरल्याची चर्चा आहे.
हेही वाचा..“मी पुन्हा येईन असा गळा फोडून सांगणारे आता मला जाऊदे ना घरी म्हणताहेत”
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपने सर्वाधिक २४० जागा जिंकल्या. तर कॉंग्रेसला फक्त ९९ जागा जिंकता आल्या. त्यामुळे एनडीए सरकारमध्ये भाजप महत्वाची चार खाती स्वत: कडे ठेवणार आहे.सरकारमध्ये मित्र पक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी पाच खासदाराच्या मागे एक कॅबिनेट मंत्री पद द्यावा लागणार आहे. तर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..अजित पवार गटातील आमदार बंडाच्या तयारीत, तातडीची बोलावली आमदारांची बैठक
एनडीएमध्ये असलेल्या नितीन कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला २ मंत्रीपद मिळतील. तर राष्ट्रीय लोक जनशक्ती चिराग पासवान यांच्या पक्षाला १ कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. यातच एनडीए सरकारमध्ये टीडीपीकडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करण्यात येणार आहे. मात्र अध्यक्ष पद देण्यात भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काय घडामोडी घडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ?
हेही वाचा..मोठी बातमी…! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार लंकेंच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला