मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर भाजपने आता महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. आघाडीने संविधान बदलणार असल्याचे खोटे नरेटिव्ह तयार करून मत घेतली. असा भाजपने म्हटलंय. त्यातच आता भाजपने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी या नरेटिव्हच्या विरोधात मोठी मोहिम हाती घेतलीय. तर आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं.
जे भाजप आमच्यावर खोटे नरेटिव्ह तयार करून मते मिळवतील असा आरोप करत आहेत. त्या भाजपने याआधी किती खोटे नरेटिव्ह तयार केले आहेत. देशातील संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील असं भाजप म्हणत होते. ते शक्य आहे का ? वीज कापली जाईल, पाण्याचा नळ कापून नेतील. प्रत्येकाला नोकरी देईन, पंधरा लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यावर टाकणार. मग भाजपने हे काय नरेटिव्ह केले होते ? असा सवाल देखील ठाकरे यांनी केलाय.
मंगळसूत्र, म्हशी चोरणार, नकली संतान हे खरे narrative होत का? असा सवाल देखील ठाकरेंनी केलाय. व्होट जिहाद म्हणजे काय? मोदी स्वतः म्हणाले मुस्लिमांच्या सान्निध्यात वाढले, त्यांच्या घरातले जेवण जेवायचे…मोदी मुस्लिम कुटुंबियांचे घरचे जेवले त्या मिठाला ते जगणार आहेत का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
यातच लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मुसलमानांनी मतदान केल्याचा आरोप देखील भाजपकडून करण्यात आला. त्यावरूनही ठाकरेंनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, लोकशाही टिकवण्यासाठी सर्व धर्मांतील लोकांनी भाजपच्या विरोधात आम्हाला मतदान केल आहे. यामध्ये मग माझे मराठी तर आहेतच हिंदू सुद्धा आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, अशी सगळीच लोक आहेत.
मुंबई अशी मराठी माणसाच्या डोळ्यादेखत लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्या लोकांचे महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदाचित झोपेत सुद्धा मत देणार नाही. त्याच्यामुळे अजुनही भाजपला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या वास्तवाला सामोरे जावं लागेल. तर देशातली जनता आता जागी झाली आहे. त्यामुळे मोदींचं पंतप्रधान पद कसंबसं वाचलं असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”