रायगड : अलिबागमध्ये पिछाडीवर राहिन असा अपप्रचार सुरू होता. मात्र हा अपप्रचार खोडून काढण्याचे काम अलिबागकरांनी केले. मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस संपले हे अलिबागकरांनी दाखवून दिले आहे. ज्यांची मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडून काढण्याचे काम अलिबागने केलेच शिवाय मताधिक्यही दिले याचा अभिमान सांगताना महायुती आजही आणि उद्याही एकत्र राहणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचाच झेंडा फडकवायचा असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
आयुष्यातील ही आठवी निवडणूक होती पण विचार करायला लावणारी होती. संविधान बदलाबाबत शंका निर्माण करण्यात विरोधकांना यश आले ते दूर करायला महायुतीला कालावधी मिळाला नाही. आपल्या महायुतीचे पदाधिकारी मतदारांपर्यंत पोचले म्हणूनच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले असे सांगतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथे सभा झाली आणि रायगडचा विजय निश्चित झाला होता असेही तटकरेंनी सांगितले.
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राजकीय जीवनात काम करताना नेहमी संयमाची भूमिका घ्यायची असते. राजकीय टिकेला सामोरे गेलो. परंतु संयम कधी सोडला नाही. मोर्बे येथे विरोधकांची सभा झाली आणि अल्पसंख्याक समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर काही न बोलता संयम ठेवून काम केले आणि यश मला मिळाले.
दिल्लीत देशातील एनडीएचे २१ नेते पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित त्यात तुमचा खासदार सुनिल तटकरे उपस्थित होता. याचा मला अभिमान आहे असे सांगतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहापान कार्यक्रमात मला ‘सुनिल काहीतरी घ्या’ असे मराठी भाषेतून बोलले याचा मला अभिमान वाटला. इतका मोठा नेता मला नावाने हाक मारून चौकशी करतो शिवाय माझ्या मुलीचीही विचारपूस करतात त्या शब्दांनी माझ्या अंगावर रोमांच उभा राहिला. हे अनुभव तुमच्यामुळे मला घ्यायला मिळाले आहे असेही अनुभवाचे कथनही तटकरे यांनी केले.
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”
विरोधकांनी कुणाच्या नावाने निवडणूक लढली नव्हती मात्र आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावावर निवडणूक लढलो याचा आम्हाला अभिमान आहे असेही आवर्जून स्पष्ट केले. कामाच्याबाबतीत तुम्ही निर्धास्त रहा. अलिबागकरांनी भरभरून प्रेम दिले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो असलो तरी मी महायुतीचा खासदार म्हणून काम करणार आहे असा शब्दही त्यांनी दिला.
मला मंत्री होण्यापेक्षा आज माझ्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातील विधानसभा हे लक्ष्य आहे. राज्यात पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने महायुतीचे सरकार आणायचे आहे त्यासाठी आतापासून जोरदार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. माझ्या पदरात अभूतपूर्व यश अलिबागमध्ये मिळाले आहे. त्यामुळे इथे रोजगाराची साधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.
READ ALSO :
हेही वाचा…“आता मोठा भाऊ, छोटा भाऊ चालणार नाही”, पृथ्वीराज चव्हाणांनी खडसावलं
हेही वाचा..“देशातील जनता जागी झाली, मोदींचं पद कसंबसं वाचलं”, उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक टोला
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’