मुंबई : मुंबईत आज सकाळी वीज पुरवठा खंडित झाला आणि सगळी मुंबई ठप्प झाल्याचे पहायला मिळाले त्यानंतर विरोधक असलेल्या भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकाराचे नियोजन शून्य असल्याची टीका केली होती. याचदरम्यान आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुंबईतील जुहू, अंधेरी, मिरारोड, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेक टिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ट्विटरवरही अनेकांनी आपल्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली आहे.अचानक पद्धतीने संपूर्ण मुबईमध्ये वीज पुरवठा गेल्याने अर्धी मुंबई ठप्प झाली होती.
नितेश राणे म्हणाले की, काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, बसल्या पासुन जे कधी नाही ते सगळ होत आहे . आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत. त्यामुळे आता ते ही कदाचित दिसतील, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे !!
बसल्या पासुन .. जे कधी नाही ते सगळ होत आहे ..
आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत..
ते ही दिसतील कदाचीत..
पनवती!!!— nitesh rane (@NiteshNRane) October 12, 2020
nilesh rane on cm uddhav thackarey