मुंबई : सुरुवातीला महाराष्ट्रात आणि नंतर देशात लागू करण्यात आलेली टाळेबंदीने महाराष्ट्रातील परिवहन एसटीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असल्याची भावना परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाकाळात प्रवास बंदी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बस या आगारात उभ्या होत्या त्यामुळे मोठं नुकसान झालय असं त्यांनी म्हटलं आहे.
एसटी कामगारांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार ३०० कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे कांही आगार बस स्थानक तारण ठेवली जाणार आहेत. अशी सुद्धा परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपवर टीका करताना त्यांनी किरीट सोमैय्या यांच्यावर निशाणा साधलाय. फक्त आरोप करणं किरीट सोमय्यांचं काम, त्यांना भाजपमध्ये कुणी सिरियसली घेत नाही अशी टीका राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माजी खासदार भाजप नेते किरीट सोमैयांवर केली आहे.
मुंबईतील महानगरपालिकेत गैरव्यवहार आणि धार्मिक स्थळ उघडण्यावरून मागील काही दिवसांपासून किरीट सोमैय्यानी महाविकास आघाडी दरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांनी टीका केली होती आता त्याला उत्तर देताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हि टीका केली आहे.
Read Also :
पवारांनी आमदारकीचा दिलेला शब्द पाळला पाहिजे ही अपेक्षा: रविकांत तूपकरhttps://t.co/SRYOmsl7Ia @rajushetti @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020