आळंदी: यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
हे पण वाचा: देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांना; सरकराच्या ‘या’ शर्तीवरच परवानगी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका आज (दि.२) निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल ३७ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यापूर्वी एकच खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा: मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय
आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी आदींची दोन दिवस कोविड – १९ ची चाचणी करण्यात आली आहे. कोविड चाचणी नंतर संबंधित वारकऱ्यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान संबंधित वारकऱ्यांच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर एकूण ३७ सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.