औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकत्यांशी संवाद साधतान दिसत आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसत आहेत.
देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूंनी घेतली शपथ; वाचा संपुर्ण भाषण
आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांना हिंमत असेल तर पुन्हा निवडणुक लढवावी, असा इशार दिला होता. त्यानंतर जर मला एकनाथ शिंदे यांनी आदेश आला तर मी पुन्हा निवडणुक लढवण्यास तयार अब्दुल सत्तार यांनी असल्याचे म्हटले आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही शक्तिप्रदर्शन करा, मात्र गद्दारीचा डाग कायम राहणार आहे. तो कधीही पुसला जाणार नाही, अशी टीका दानवे यांनी केली आहे. यासोबतच सत्तार यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभेचं तिकीट दिले शिवसेनेतुन निवडणुक लढून ते आमदार बनले. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुक लढवून दाखवावी असे आव्हान दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना केले आहे.
“रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा, पण आता नाही;” फडणवीसांचा जोरदार एल्गार
यापुर्वी, आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना पुन्हा निवडणुक लढवावी आणि निवडून येऊन दाखवावे असं आव्हान केले होते. या आव्हानाला उत्तर देताना सत्तार यांनी मी माझ्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार आहे. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचा आदेश दिला पाहिजे, त्यांचा आदेश आला की मी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवेन असं सत्तार म्हणाले.
“सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या, हे महाराष्ट्राला माहितीय”; वैभव नाईकांचा राणेंवर पलटवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन सत्ता स्थपन केल्यानंतर शिवसेनेने बंडखोर आमदारांवर टीका करायला सुरुवात केली. आदित्य ठाकरे वारंवार बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. यासोबतच बडखोर आमदारांवर टीका करताना दिसत आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यामध्ये वारंवार एकमेकांवर टीका केली जात आहे.
Read also
- “उद्धव ठाकरे राजकारणात पुन्हा उभारी घेणार नाहीत”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
- “उद्धव ठाकरे राजकारणात पुन्हा उभारी घेणार नाहीत”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
- “याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत”; पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंचा टोला
- “अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा”
- नक्की मुख्यमंत्री कोण? भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेला शिंदेंच्या जागी फडणवीस उपस्थित