धुळे: महाराष्ट्र राज्यात जागतिक महामारीचा मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पण जागतिक महामारीचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच ठिकाणी रेमडेसीव्हीर, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचे दिसून आले आहे. धुळे महानगरपालिकेच्या बैठकीत नगरसेवकांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार फक्त येतात बिर्याणी खाण्यासाठी येतात का? धुळे महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा सवाल उपस्थित केला.
रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत असताना पालकमंत्री फक्त बिर्याणी खाण्यासाठीच धुळ्याला येतात का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत विचारला आहे. काही फ़ोटोछाप आणि पत्रकेबाज मंडळींनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची बदनामी केली. त्यांच्या निषेधाचा ठराव पण बैठकीत मंजूर करण्यात आला.
यावेळी नगरसेवक बोरसे आणि मासुळे यांनी म्हटले आहे की, मागच्या लॉकडाऊन मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी काम केले होते. तेव्हा हे पत्रकबाज कोठे गेले होते? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सुनील बैसाणे यांनी यावेळी म्हटले आहे की, विरोध करायचा म्हणून नुसता विरोध पण करू नये. महानगरपालिकेने ऑक्सिजन वायू हवेतून तयार करण्याचा प्लांट उभा करावा त्याबाबतीत नगरसेवक निधी देतील.