मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने हळूहळू अनेक नियम बदलायला सुरुवात केली आहे. अनलॉक करण्यासाठी नवीन नियमावली वारंवार जाहीर केली जात आहे त्यामुळॆ, राज्य सरकारच्या या भूमिकेवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे भाकीत एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बिहारमधील निवडणुकांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले. राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकारविरोधी आहे. कृषी विधयेक आणि मंदिर उघडण्यासारखे केंद्राचे निर्णय राज्य सरकारने धुडकावले आहेत. राज्यघटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जात येत नाही. पण, महाविकास आघाडी सरकार केंद्रविरोधी भूमिका घेत असल्याचे सांगत आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
Read Also
काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्याचे. . जे कधी नाही झाले ते सगळ होत आहेhttps://t.co/JDJjmrbYKV#Shivsena #CMUddhavThackarey @NiteshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020