पुणे: “लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘राष्ट्रवादी’ मात्र कोरडे पाषाण”, पुणे शहराने कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना किती हिमतीने आणि कसा केला आहे, याचे थोडेही भान राष्ट्रवादीने ठेवले नाही, हे निषेधार्ह आहे. संकटकाळात योद्धयांप्रमाणे लढणाऱ्या प्रत्येकाचा हा अपमान असून पुणेकर या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नव्या भवनाच्या आवारात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. यावर पुणे महापालिकाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून राष्ट्रवादीच्या शहाराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते काल (शनिवारी), पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नव्या भवनाच्या आवारात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. या गर्दीत महामारीच्या सामाजिक अंतराच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडालेला असून, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीच या नियमांना हरताळ फासल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर अदयाप अजित पवारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, त्यामुळे एकीकडे “लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘राष्ट्रवादी’ मात्र कोरडे पाषाण”, असं म्हणण्याची वेळ या प्रकारामुळे आलं आहे.
पुणे शहराने कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना किती हिमतीने आणि कसा केला आहे, याचे थोडेही भान राष्ट्रवादीने ठेवले नाही, हे निषेधार्ह आहे. संकटकाळात योद्धयांप्रमाणे लढणाऱ्या प्रत्येकाचा हा अपमान असून पुणेकर कधीही विसरणार नाहीत. एकीकडे लग्न समारभांत पन्नास माणसाच्यावर गर्दी जमवल्यानंतर वधू-वरावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र राष्ट्रवादीचे पुणे शहरध्यक्षाने मात्र नव्या भवनाच्या आवारात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली बघायला मिळाली आहे. पुणेकरांना संकटात काटण्याचा अधिकार कोणी दिला आहे. त्यांनी पुणेकरांची माफी मागावी. अन्यथा पुणेकर कधिच माफ करणार नाही. अशी टिका महापौर मुरलीधर मोहोळ केली आहे.
सामान्य माणसाने साधा मास्क सुद्धा नाही घातला तर त्यांना हजोरोचा दंड ठोटावणारे, आता गुहखाते स्वता:कडे असणारी राष्ट्रावादी काँग्ररेस आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणार असा सवाल ही त्यांनी उपस्थीच केला आहे.
दरम्यान, शनिवार-रविवार पुण्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने, पुणेकरांचा हिरमोड झाला आहे. पुणेकर मोठ्या संख्येने आजूबाजूच्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणार आणि गर्दी होऊन महामारीला आमंत्रण मिळू शकते, हे लक्षात घेऊन पुण्यात हा लॉकडाऊन लावला गेला आहे. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. नाहीतर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे लागेल,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र दुसरीकडे पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ही तोबा गर्दी पहायला मिळत आहे.