नवी दिल्ली : कृषी शेत्राशी संबंधित तीन विधेयकांविरोधात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने भाजपची सोथ सोडण्याचा निर्णय घेत आहे. याआधी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.
देशभरात कृषी विधेयकांना जोरदार विरोध पाहण्यास मिळत आहे. पंजाब, हरियाणामधील शेतकरी या विरोधात रस्त्यात उतरले आहेत. या विधेयकांसाठी पक्षाने भाजपचा पाठिंबा दिला असता, तर राज्यातील मोठी वोट बँक असलेला शेतकरी वर्ग नाराज झाला असता. अकाली दलने 2022 च्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मागील 22 वर्षांपासून हा अकाली दल एनडीएमध्ये होता. मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेने पाठोपाठ आता अकाली दलाने देखील भाजपची साथ सोडली आहे.