मुंबई : औरंगाबादचे नाव संभाजीनगर बदल्याने काय साध्य होणार आहे ?, आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
“औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा. आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे? अस्मितेच्या प्रश्नाने मराठवाड्याचे प्रश्न थांबणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत”, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली. मुंबई पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र नेहमीच छत्रपतींबद्दल आदर ठेवणारे आणि त्यांची भूमिका सखारनाऱ्या कोल्हेनी हे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे शिवसेनेसाठी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नाव बदलणं हा अस्मितेचा विषय आहे. त्यांना या शहरांची नावं संभाजीनगर आणि धाराशीव करायची आहेत.त्यावर आता खासदार अमोल कोल्हेंनी भाष्य केल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे.
औरंगाबाद नामकरनाचा मुद्दा हा नेहमीच शिवसेनेच्या अग्रभागी राहिलेला आहे राष्ट्रवादी आणि सेना सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र आहे. मात्र कोल्हेनी केलेले विधान शिवसेनेला कितीपत रुचेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचे चरित्र घराघरात पोहचवनारया अमोल कोल्हे यांनी संभाजीनगर नावावरून घेतलेली वेगळी भूमिका यामुळे शिवप्रेमिमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच कोल्हेंच्या या भूमिकेने महाविकासघडीत नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे.