मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजुंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावर आता येत्या सोमवारी सुनावणी होणार असून हे प्रकरण आता पाच खंडपीठाकडे जाणार का ? ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे. यातच राज्यपालांच्या भूमिकेवरून राज्यातील राजकीय तज्ज्ञांनी प्रश्निचिन्ह उपस्थित केलं आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
भारत हा संघराज्य असून यामध्ये राज्यपालांची भूमिका फार महत्वाची असते. मात्र आजच्या राजकीय परिस्थितीवरून असं चित्र निर्माण झालं आहे की, राज्यपाल हे केंद्र सरकारचा एजंड असल्याचं वागत आहेत. त्यामुळे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्यपालांना सुनावलं होतं की, तुम्ही राज्याचे संविधानचे प्रमुख आहेत. त्याप्रमाणे तुम्ही वागायले हवेत. असंही देखील कायदेतज्ज्ञ उल्हास बापट सांगितलं आहे.
“कोणत्या ना कोणत्या राज्यात तुमचीपण ईडी सुरू होईल”; खैरेंचा तानाजी सावंत यांना इशारा
तसेच भारतीय संविधानानुसार पक्षांतर होत आहे. ते लोकशाहीला फार धोकादायक आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील खंडपीठाकडे सोपवलं तर पक्षांतर बंदी कायदा आणि राज्यपालांची भूमिका या दोन्ही गोष्टी त्यांना कायमच्या ठरवाव्या लागतील. त्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने एकदा निर्णय घेतला तर सर्व न्यायालयामध्ये तो बंधनकारक ठरतो. देशात 28 राज्य असून अनेक ठिकाणी पक्षांतर होत आहे. त्यामुळे हा निर्णय सगळ्यांना प्रभावी ठरणारा होऊ शकतो. असं देखील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.
“सीएनजीने दरवाढीचा षटकार अन् मुंबईकरांची मात्र महागाईने विकेट”
दरम्यान, उल्हास बापट यांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेत अमोल मिटकरी यांनी याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, संघराज्यामध्ये राज्यपालांचा सहभाग महत्त्वाचा व राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असे घटना तज्ञांचे मत असले तरी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संघराज्य म्हणजे “रेशीमबाग” असेच वाटत असावे,म्हणून ते संघाला पोषक असे वागतात. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायला वेळ काढावा.
Read also
- “शिवसेना अन् पक्ष चिन्हांबाबत निर्णय घेऊ नका”; न्यायालयाचे आदेश, ठाकरेंना दिलासा
- “न्यायालयात स्पष्ट झालं की, शिंदे गट सत्तेसाठी भाजपच्या कुशीत जाऊन बसला”
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनणार भावी विश्वगुरु? मोदीला पण मागे टाकणार
- “जे चालवलय ते बरे नव्हे शिंदे साहेब, फडणीसांच्या नादाला लागुन राज्य अधोगतीकडे नेत आहात”
- राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन