मूबई: राज्यात ५ आणि ६ जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कॅबिनेची महत्त्वाची बैठक या मुद्यावर होणार चर्चा, भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर चर्चा होणार, तसेच पुढील रणनीति आखली जाण्याची शक्यता आहे. लसीकरणाबाबत चर्चा होणार, कृषी कायद्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांना कसे उत्तर देणार याचीही रणनीति आखणार आहेत अशी माहिती सुत्राकडून मिळत आहे.
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. मात्र भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
ओबीसी आरक्षणाच्या प्रस्तावावेळी गदारोळ करणाऱ्या आणि असंसदीय वागणूक करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन भास्कर जाधव यांनी केलं. महाविकास आघाडीचे १२ आमदार राज्यपालांनी रोखून धरले, त्याचा बदला जाधवांनी १२ आमदार निलंबित करुन घेतला, अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं वागणं तालीबानी वागणं, असल्याचा हल्लाबोल केला. अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.