हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत आहे. हाथरस प्रकरणाचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे. राजकीय नेत्यांवर लाठीमार केल्याचे प्रकार घडले. विशेष म्हणजे माध्यमांना भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं.
आज हाथरसमध्ये सोमवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय सिंह हाथरसमध्ये गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. पीडित तरुणीचा मागच्या आठवड्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हाथरसला गेलेले संजय सिंह, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या शिष्टमंडळाने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर घराबाहेर संजय सिंह प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिथे असलेल्या एका व्यक्तीने संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले व ताब्यात घेतले.
हाथरस में कायराना हरकत पुलिस अपनी सुरक्षा में गुड़िया के घर लेकर गई लौटते समय हमला हुआ MLA राखी बिडलान अजय दत्त व फ़ैसल लाला साथ थे,योगी जी आप “ठाकुर नही कायर हो” मुझ पर चाहे जितने मुक़दमे लिखो जेल भेजो लाठी चलाओ या हत्या करवा दो लेकिन गुड़िया के लिये न्याय की लड़ाई जारी रहेगी pic.twitter.com/8DA9ln4ZYo
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) October 5, 2020
हाथरस बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळत असून युपी पोलिसांच्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका होत होती. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.
पीडित मुलीचे गाव बुलगढीला पोलिसांनी वेढा घातला असून गावाची पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. गावाबाहेरील कोणालाही आत सोडले जात नाही. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावकरीही बाहेर येऊ शकत नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. विशेष तपास पथक चौकशी करत असून त्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी कोणालाही गावात जाऊ दिलेले नाही, असे स्पष्टीकरण पोलीस उपमहासंचालक प्रवनकुमार यांनी दिले. पीडित मुलीच्या नातलगांशी दूरध्वनीवरूनही बोलू दिले जात नसल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे.
Read Also :
मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी केली गेली: परमवीर सिंह https://t.co/BZQaf9RToU @ramkadam @KanganaTeam @sachin_inc @satyajeettambe @mybmc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020