मुंबई : केंद्र सरकारनेच्या कृषी विधयकावरून देशाचे राजकारण तापले आहे. राज्यसभेत प्रचंड गोंधळानंतर हे विधयक मंजूर करण्यात आले. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असली तरी शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारे हे विधयेक असल्याचे मत भाजप आमदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आहे.
फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी या विधायकाचे संपूर्ण विश्लेष दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्याचा पर्यंत केला. तसेच त्यांनी विरोधकांवर टीका हि केली आहे. “या विध्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला नवीन स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच उत्पादन विकण्याचा हक्क मिळाला असून सर्व पक्षांनी केलेल्या मागण्या या विधयकात मान्य झालेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्यांचा राजकरण आहे तसेच ज्या व्यापाऱ्यांना वाटत होत कि आपल्याला शेतकऱ्याला लुटण्याचं हक्क मिळालं आहे त्या घराण्याचं मोठं नुकसान होणार आहे . त्यामुळे या विध्यकाला पुरस्कृत विरोध होत असल्याची टीका बोंडे यांनी केली आहे.
‘जे दलाल करोडो रुपये कमावत होते, जे व्यापारी शेतकऱ्यांच शोषण करत होते , त्यांचा अधिकार संपल्याने हे आंदोलन होत आहे. तसेच जे राजकारणी या कृषी उत्पन्न समितीच्या जीवावर अधिकार दाखवत होते ते संपणार आहे , त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच ‘एवढे दिवस काँग्रेसने कृषी उतपन्न बाजार समितीचे अधिकार कमी करण्याच्या घोषणा केल्या मात्र त्यांनी हे विधायक आणले नाही कारण काँग्रेसवर दलालांचे उपकार होते , अश्या शब्दात त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केली