मुंबई : ‘हाथरसमधील घटना देशासाठी शरमेची बाब आहे. देशात सध्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ते अपुरे पडत आहेत.’ तसेच नराधमांना फाशी द्या अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे .
निष्क्रीय सरकार आणि व्यवस्थेचे कान टोचण्यासाठी देशातली यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली असल्याचं ते म्हणाले. ते म्हणाले की, ‘हाथरसमधील घटना देशासाठी शरमेची बाब आहे. देशात सध्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ते अपुरे पडत आहेत.
बलात्कारासारखे अक्षम्य गुन्हे करणारे नराधम मानवतेसाठी कलंक असल्याचे ते म्हणाले. देशाच्या भव्य सांस्कृतिक वारशाचे उदाहरण देत त्यांनी भारताच्या ऋषीमुनींपासूनच्या परंपरांचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘भारताची संस्कृती विश्वातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. देशात अशा प्रकारचे गुन्हे घडणे ही खूप चिंताजनक बाब असल्याचे म्हणाले आहे.
Read Also :
‘शटअप या कुणाल’ मध्ये संजय राऊत लावणार हजेरी ! होणार मोठे गौप्यस्फोटhttps://t.co/BTuDsuZrb9#sanjayraut #kunalkamra @kunalkamra88 @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020