मुंबई : केंद्र सरकरने महाराष्ट्राला मदत करताना भेदभाव करू नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रानं पथक पाठवावे. महाराष्ट्रातील शेतकरी ही भारताचे नागरिक आहेत, त्यांना केंद्र सरकारने मदत करावी, असं आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी मदतीसाठी केंद्राकडे याचना केली होती, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटीचा परतावा द्यावा अशी मागणीही करण्यात आली होती. तथापि सरकारमधील अनेक नेत्यांनी नुकसानग्रस्त विभागांची पाहणी केली होती. पण आता सरकाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौऱ्यात आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलं होत.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे याचे भान ठेवून वागावे, असा सल्ला विश्वजित कदम यांनी दिला आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस मधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. त्यापार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीला सल्ला दिला आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये शेती क्षेत्राला सर्वाधिक मदत करण्यात आलीय.भाजप सरकारच्या काळात दर हेक्टरी 8 हजार रुपये देण्यात आले होते. आम्ही शेतकऱ्यांना 10 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असल्याचे कदम यांनी सांगितले.
दरम्यान नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. असा देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे.
Read Also ;
विश्व हिंदू परिषदेने मंदिरांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा जर प्लाझ्मा दान करावं: मंत्री अस्लम शेखhttps://t.co/RjOUosC7Jg #MaharashtraGovt
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020