हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकारवर बिनबुडाचे आरोप केले आहेत आणि मुंबई पोलिसांना बदनाम केले आहे. याची गंभीर दखल गृह विभागाने घ्यावी यासाठी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिकन टीव्ही या वृत्तवाहिनीवर चर्चा सत्रात १२ ऑगस्ट, १३ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी सुशांत सिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांविरोधात आक्षेपार्ह विधाने केली. कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारची विधाने करून गोस्वामी यांनी जनतेच्या मनात सरकार आणि पोलिसांबाबतची प्रतिमा मालिन केली आहे.
कोरोनाकाळात खंभीर योध्याप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांच्या मनोबलावर या विधानांमुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे गोस्वामी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अनिल देसाई यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.