मुंबई : वेळ आली तर मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. गेल्या तीन महिन्यात शिवसेना फोडण्याचा आणि तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. पण ही शिवसेना तुटली नाही. ही शिवसेना अभेद्य शिवसेना आहे, ही बुलंद शिवसेना आहे, हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील विजयांन दाखवून दिलं आहे. आता मशाल भडकली आहे. असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एका विरोधकांवर तोफ डागली. त्यांना काल गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी जामीन मंजुर झाला. त्यानंतर ते बोलत होते.
“मी मरून जाईन, पण..;” संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर खैरेंची प्रतिक्रिया
आता महाराष्ट्रात केवळ एकच शिवसेना राहिल ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची असेल. मी 103 दिवस तुरूंगात होतो. आता आपल्याला 103 आमदार निवडून आणायचे आहेत. आर्थर रोड तुरूंगातून आपल्या पक्षाचंच काम करीत होतो. आपल्याच पक्षाचा विचार करत होतो. असं देखील राऊतांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो, तभी हमारी सरकार आ जाएगी, असे आदेश देण्यात आले. हे मला माहित होतं. महाराष्ट्रातले बोके आता खोक्यावर बसले आहेत. आता फक्त ओके शिवसेना असेल, तीही फक्त आपल्या उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची. असंही देखील त्यांनी म्हटलं आहे.
तोफ पुन्हा रंणागणात आली..! जामीन मंजुर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आपल्या हातातून मुंबई काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली. पण ते होणार नाही. असा आऱोप देखील त्यांनी केला. आर्थर रोड असो की अंदमान, तुरूंग हा तुरुंगच असतो. मी 100 दिवसांपेक्षा अधिका काळ तुरूंगात होतो. याचं काय कारण आहे, माझा काय गुन्हा आहे,? मला तुरुंगात का पाठवण्यात आलं हे मला अद्यापही माहिती नाही. तसेच संजय राऊतांना अटक करून त्यांनी खुप मोठी चुक केली आहे. ही देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चुक असेल. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- तोच दरारा, तेच हातवारे, संजय राऊतांनी पहिली छबी..! आली पहिली प्रतिक्रिया…म्हणाले…;
- राऊतांच्या स्वागतासाठी 500 बाईक तयार..! राऊतांचं जल्लोषात स्वागत
- कोर्टोने उलट इडीला फटकारले..! संजय राऊत आजच तुरूंगातून बाहेर येणार
- “क्रांतीची धगधगती ‘मशाल’ घेऊन खोके वाल्यांचा ओक्के कार्यक्रम करायला तोफ सज्ज”
- राज्यात पुन्हा एकदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा..! कोण बाजी मारणार..?