जळगाव – जळगाव महापालिकेत पूर्ण बहुमत असलेल्या भाजपला अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. मात्र नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणुकीआधीच भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जळगावात राजकीय भूकंपाचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे ५७ पैकी तब्बल २७पेक्षा अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. त्या बाबत भाजप मधील काही नेत्यांनींही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. या मुले गिरीश महाजनांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर गेले. रविवारी दुपारी दोन वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी तीनच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाउसवर एकत्र झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सायंकाळी सातच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.
जळगाव महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसताना सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही महापौर व उपमहापौरपद निवडणूक खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठी रंगतदार ठरबनार हे नक्की आहे. जळगावमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन यांची उमेदवारी निश्चित केली. त्या अगोदर शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्मपाळत एकनाथ खडसेंचाच या मागे हात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल कर लागतो यावर बराच काही अवलंबून आहे, आता गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे कुरघोडी करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.