मुंबई : दसरा मेळावा एकच असतो तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. गद्दारांनी दिल्लीच्या मालकांची चाकरी करावी, तुम्हाला आता घरीच बसायचं आहे. काय करायचं आहे ते तुम्हीच ठरवा. असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे.
राज्यात पापींचं राज्य सुरू आहे, त्यामुळेच आपल्यावर निसर्ग कोपतोय. अध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. एक रूपयात पीक विम्याचं गाजर शेतकऱ्यांना दाखवलं गेलं आहे. विमा कंपन्यांची खळगी भरण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा डाव आहे. अशी टिका देखील अंबादास दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, आजचे विचार प्रत्येक बुथमधून आपल्या घरोघरी पोहचवायला हवं आहे. आमच्या शिवसैनिकांना पैसे देऊन बोलवण्याची गरज पडत नाही. एक शिवसैनिक हा लाख शिवसैनिकांच्या बरोबर आहे. खुर्च्या खुप मिळतात. पंरतु बाळासाहेबांचा आत्मा मिळत नाही. असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावरील भाषणातून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.