सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र काहींनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपास करत आहेत.
याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे.
या सर्व प्रकरणावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुंबईतील पावसामुळे झालेल्या रस्त्यांची स्थिती आणि पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. या दोन्ही प्रकरणावरून आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यान टोला लगावला आहे.
“व्हर्च्युअल राज्य सरकार” व “व्हर्च्युअल मुंबई पालिकेने” जसे रस्त्यावरील खड्डे व्हर्च्युअली भरले, नाल्यातील गाळ व्हर्च्युअली काढला. सुशांत सिंह रजपूत केसचा तपास कोरंटाईन विनय तिवारी यांनी व्हर्च्युअलीच करावा असा सल्ला दिलाय! घरातच बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर हा सल्ला नाही ना?” असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.