काँग्रेसच्या भावी नेतृत्वाबद्दल सध्या सगळ्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह असताना काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र दोन गट निर्माण झाल्याचे दिसतात. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावं या निवेदनाचं एक पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
काय म्हणालेत अशोक चव्हाण पत्रामध्ये
‘पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे
इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल.
खा. राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे.
खा. राहुलजी गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत.
नेत्यांनी एकत्रितपणे नवा पक्षाध्यक्ष नेमावा, आपण ही धुरा सांभाळू इच्छित नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस कार्यसमितीची आज बैठक होणार आहे. त्यात अध्यक्षपदाविषयी काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 23, 2020