मुंबईसह उपनगरात मागील 2-3 दिवसात पावसाचा जोर कायम आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळखर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला फ्लडगेट लावा असा निशाणा भातखळकर यांनी साधला आहे.
अतुल भातखळखर म्हणाले की, मातोश्री समोरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पम्प आणि फ्लडगेट लावलेत, तसेच फ्लडगेट मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला लावले असते तर मुंबईकर गळ्यापर्यंत पावसाच्या पाण्यात बुडाले नसते.
मातोश्री समोरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पम्प आणि फ्लड गेट लावलेत तसेच फ्लडगेट BMC च्या भ्रष्टाचाराला लावले असते तर मुंबईकर गळ्यापर्यंत पावसाच्या पाण्यात बुडाले नसते.@OfficeofUT @mybmc @MiLOKMAT @LoksattaLive @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @JaiMaharashtraN @News18lokmat pic.twitter.com/UtFM5tM70C
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 4, 2020
आदित्य ठाकरेंना देखील टोला लगावत भातखळकर म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे कोरोनाच्या काळात केव्हाही उपनगरांमध्ये फिरकले नाहीत. पावसामुळे मुंबईच्या उपनगरांमधील जनतेची काय अवस्था झाली आहे, ते पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्युनिअर ठाकरेंना उपनगरात पाठवले ते बरे होईल.
भातखळकर म्हणाले की, मागीलवर्षी वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी तुंबले होते. आता तेथे पाणी साचू नये म्हणून गेल्या सहा महिन्यात एक हजार वॉट क्षमतेचे पंप लावले. त्यामुळे मातोश्री आणि कलानगर 100 टक्के सुरक्षित झाले. आपण आपल्या घरासाठी तर फ्लडगेट लावले, मात्र मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे फ्लडगेट सताड उघडे ठेवले आहे.