मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. यावरून काँगेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली होती त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.’ बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’, असं म्हणत त्यांनी सचिन सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडलं .
सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा (Viscera) रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
‘एस्मचा अहवाल आल्यानंतर सचिन सावंत म्हणाले की भाजपला झटका बसला आहे. मला कळत नाही की त्यांना एम्सचा अहवाल कोणी सांगितला’, असं अतुल भातखळकर म्हणाले.
‘बिहारमध्ये काँग्रेसचे लोक स्वत: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत होते. त्यामुळे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असी परीस्थिती काँग्रेस प्रवक्त्यांची झाली आहे’, असं म्हणत भातखळकरांनी सचिन सावंत यांना उत्तर दिलं. तसेच, सुशांत सिंह राजपूत प्रकरमणात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल असेही ते म्हणाले आहेत.
Read Also :
केंद्रातील सरकार हे जनसामान्यांचे नसून फक्त सूट बूट वाल्यांचे आहेhttps://t.co/jpfwDKQTwH#PMModi #Congress #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020