नवी दिल्ली : 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिद पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. आज या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार आहे.
बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होती.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर आज लखनौचे एक विशेष न्यायालय मोठा निर्णय देणार आहे. या प्रकरणात भाजपाचे वरिष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यासह एकूण 32 आरोपी आहेत. याच आरोपींतील एक असलेले रामजन्मभूमी न्यासचे सदस्य रामविलास वेदांती यांनी निकालापूर्वीच, आपण बाबरी ढाचा तोडला आहे आणि यासाठी आपल्याला फाशीची शिक्षा झाली तरी तयार आहे,असे म्हटले आहे.
वेदांती म्हमाले, ‘आम्हाला विश्वास आहे, की मंदिर होते, मंदिर आहे आणि मंदिर राहील. आम्ही तो ढाचा तोडवला, याचा आम्हाला अभिमान आहे. ढाचा तोडण्याच्या आरोपात फाशी झाली, जन्मठेपेची शिक्षाही झाली, तरी आम्ही रामललासाठी जेलमध्ये जाण्यास आणि फासावर जाण्यास तयार आहोत. मात्र, रामललांना सोडण्यास तयार नाही.’
Read Also
बचत गटातील महिलांची कर्ज माफ करावी, मनसेकडून कोरोनाकाळातील सर्वात मोठा मोर्चा !
https://t.co/UABVLjgw6h#MNS #RajThackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020