नवी दिल्ली : आज बहुचर्चित बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल लागला न्यायालयाने सर्व आरोपीना यामध्ये निर्दोष मुक्त केले यानंतर एमआयएमचे प्रमुख ओवेसींनी न्यायालयाच्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करत हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश आज देण्यात आला असल्याचे म्हंटले आहे.
लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं बाबरी मशीद प्रकरणातील ३२ आरोपींची आज सुटका केली. ही घटना पूर्वनियोजित नव्हती. तर ती अचानक घडल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. न्यायालयाच्या निकालावर ओवेसींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘कोणीच दोषी नसेल तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का ? मशिदीत जादूनं मूर्ती ठेवण्यात आल्या का ? मशिदीचं कुलूप जादूनं उघडण्यात आलं का ?,’ असे सवाल त्यांनी विचारले आहेत.
Decision by CBI court is a black day for Indian judiciary because the SC already said in civil property dispute of the site as 'an egregious violation of rule of law' & 'calculated act of destroying a public place of worship': A Owaisi, AIMIM, on the #BabriMasjidDemolitionVerdict https://t.co/vtj53XHQEV
— ANI (@ANI) September 30, 2020
बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी चिथावणी दिली होती आणि हे संपूर्ण जगानं पाहिलं, अशा शब्दांत ओवेसींनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं. ‘बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचला गेला. मशीद पाडली जाईपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नका, असं आडवाणींनी कल्याणसिंह यांना सांगितलं होतं. पुढे हेच कल्याणसिंह राज्यपाल झाले. आडवाणी उपपंतप्रधान झाले. उमा भारती केंद्रात मंत्री झाल्या. बाबरी पाडून त्यावरच या सगळ्या नेत्यांची त्यांची कारकीर्द उभी राहिली,’ असं ओवेसी म्हणाले.
हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश देणारा निकाल सीबीआयच्या न्यायालयानं दिल्याचं ओवेसी म्हणाले. ‘लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी हिंसाचार झाला. जाळपोळ झाली. घरं पेटवून देण्यात आली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक धक्का ओर दौ, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या होत्या. मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय लाभासाठी मशीद पाडली. पुढे यातूनच त्यांना सत्ता मिळाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,’ असं ओवेसी म्हणाले.
Read Also
उत्तर प्रदेशमधील घदटनेवर गृहमंत्री तत्काळ ट्विट करतात, महाराष्ट्रातले अत्याचार त्यांना दिसत नाहीत का ? चित्रा वाघ यांचा अनिल देशमुख यांना सवाल https://t.co/KAKx66qyox#ChitraWagh #AnilDeshmukh #BJP #NCP @ChitraKWagh
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020