पाटणा : बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
आयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाइल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ते पुढे म्हणाले, धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
दरम्यान या प्रकरणावरून एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी चिथावणी दिली होती आणि हे संपूर्ण जगानं पाहिलं, अशा शब्दांत भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं. ‘बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचला गेला. मशीद पाडली जाईपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नका, असं आडवाणींनी कल्याणसिंह यांना सांगितलं होतं. पुढे हेच कल्याणसिंह राज्यपाल झाले. आडवाणी उपपंतप्रधान झाले. उमा भारती केंद्रात मंत्री झाल्या. बाबरी पाडून त्यावरच या सगळ्या नेत्यांची त्यांची कारकीर्द उभी राहिली,’ असं ओवेसी म्हणाले.
हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश देणारा निकाल सीबीआयच्या न्यायालयानं दिल्याचं ओवेसी म्हणाले. ‘लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी हिंसाचार झाला. जाळपोळ झाली. घरं पेटवून देण्यात आली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक धक्का ओर दौ, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या होत्या. मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय लाभासाठी मशीद पाडली. पुढे यातूनच त्यांना सत्ता मिळाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,’ असं ओवेसी म्हणाले.
Read Also :
कोणीच दोषी नसेल तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का ? ओवेसींचा सवालhttps://t.co/xxe2CF52yU#MIM #Babaricase @asadowaisi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020